यशस्वी ....देवस्थान जमीन आणि वक्फ बोर्डाची जमीन कसणार्या शेतकऱ्यांना मिळणार न्याय...
लढाई जिंके पर्यंत लढा सुरूच राहणार ....अ.भा.किसान सभा..!
अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य कमिटीच्या नेतृत्वाखाली इनामी देवस्थान व गायरान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे राज्यव्यापी दिवा बत्ती आंदोलनाला विभागीय आयुक्तालय औरंगाबाद येथे सुरुवात झाली असून.या आंदोलनाला संबोधित करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. डॉ अशोक ढवळे,किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ किसन गुजर,राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले,कोषाध्यक्ष कॉ उमेश देशमुख, दादा रायपुरे, सिद्धप्पा कलशट्टी,कॉ.शंकर सिडाम, विजय पाटील,भगवान भोजने,कॉ शिंदे,किशोर पवार, कॉ.जितेंद्र चोपडे यांची उपस्थिती असून सायंकाळी ६.३० वाजता दिवा बत्ती आंदोलनाची सुरवात करण्यात आली आणि लवकरच बैठक लावण्याचे अश्वासन महसुल मंत्री मा.थोरात साहेबांच्या वतीने देण्यात आले.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji